सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या उपक्रमाची गरज आहे. वकृत्वातून भाऊसाहेब घडले. भाऊसाहेबांना अपेक्षित असणारे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. आज ५ जानेवारी रोजी सकाळी अकरा...