शेतशिवारातील नदीकिनारी कामावर असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सुदाम सिताराम मात्रे (५०, रा. बळपाणी, ता. तिरोडी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान मौजा बळपाणी शेतशिवारात सुदाम मात्रे हे मृतावस्थेत पडून असल्याचे त्यांचा मुलगा अजय मात्रे याला दिसून आले. त्यांना विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मेकेप