शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यांनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणात आता शेकापने उडी घेतली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी, सीबीआय सह सर्व सरकारी एजन्सी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमदार दळवी यांच्यावर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत खास करून त्यांची या प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केलीय.