मोठी बातमी! ₹2 लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ₹2 लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी "कर्जमाफीची रक्कम कमी आली असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी माहिती द्यावी," असे आवाहन केले. तसेच राज्यात 84 टक्क्यांहून अधिक पेरणी पूर्ण झाली असून, पावसाची सरासरी 94 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भरणे यांनी सांगितले की, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. कर्जमाफीच्या रकमेबाबत शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावरही लक्ष दिले जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!
#DattatrayBharane #LoanWaiver #Farmers #Maharashtra #Agriculture #BreakingNews #MarathiNews #TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Jul 29, 2026