लातूर : स्थानिक विकास, समाजहिताची भूमिका आणि तरुणांच्या अपेक्षांना न्याय देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करीत श्री. मुन्नाभाई शेख, जमीरजी शेख व त्यांच्या मित्रपरिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून आगामी काळात सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केला.