औसा - शेतकऱ्यांच्या पिढ्यान्पिढ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निर्णायक तोडगा काढत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अखेर अस्तित्वात आली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी गेल्या ४–५ वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या योजनेची कार्यपद्धती स्पष्ट करणारा शासकीय आदेश काल निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.