कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वर्धा शहरात कलावंतांची वारी काढण्यात आली. कला आणि भक्तीचा सुंदर संगम घडवणारी ही वारी आज वर्धेकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.मंगल वस्त्र परिधान करून हातात ध्वज घेऊन वर्ध्यातील अनेक कलावंतांनी या वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विठ्ठल परंपरेचा वसा जोपासत या वारीचे आयोजन करण्यात आले असून श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा रंगतदार मेळा वर्ध्यात अनुभवायला मिळाला.ही वारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास रामनगर येथून सावंगी विठ्ठल मंदिर पर्यंत क