बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातील नागरिकांनी गावात नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि शहराध्यक्ष सौरभ भगत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अकोला येथील जिल्हा नियंत्रक (MSRTC) यांना निवेदन दिले. सध्या गावात सार्वजनिक वाहतूक नसल्याने विद्यार्थी, कर्मचारी आणि ज्येष्ठांना अडचणींचा सामना करावा लागतो. सकाळी ९ व सायंकाळी ५.३० वाजता बससेवा सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.