वर्धा. शहरालगत असलेल्या पिपरी प्लस 13 गावांसाठी अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने या योजनेचे पुर्नजीवन करण्यात येऊन 210 कोटी रूपयांची तरतूद करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. या संदर्भात गुलाबराव पाटील यांच्या दालनात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अन्य योजनांचा देखील आढावा घेण्यात आला.