जळगाव: टिटवी येथील विवाहितेला शॉक देऊन जीवे मारल्याचा आरोप; कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पारोळा तालुक्यातील टिटवी येथील विवाहिता कविता राजू सोनवणे हिचा सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून शॉक देऊन जीवे मारल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस सहा महिन्यांपासून कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत, कुटुंबीयांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.