राजकारणाच्या धबडग्यातून वेळ काढत, नेत्यांनी जनतेशी किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आपण नेहमीच पाहतो. मात्र, वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नुकताच एक वेगळा आणि कौटुंबिक असा संवाद साधला. निमित्त होतं, वर्ध्यातील पत्रकारांसोबतच्या एका अनौपचारिक भेटीचं. कुठलाही शासकीय प्रोटोकॉल नाही की कामाचा ताण नाही; केवळ आपुलकी आणि जिव्हाळ्याची ही भेट नक्की कशी होती, या भेटीची शहरात जोरदार चर्चा 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7वाजता सुरू होती