तोफखाना पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अंमलदारांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय निंदनीय आहे. ज्यांनी हे केले असले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पोलिसच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शहराचे आमदार तसेच पालकमंत्री यांनी जिल्ह्यात लक्ष घालावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली