यवतमाळ: निवडणूक प्रचारामुळे कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे झाले कठीण,शेतकरी त्रस्त,यवतमाळ तालुक्यातील वास्तव
जिल्ह्यात नगर निवडणुकीचा धुरळा उडत आहे, ऐन कापूस वेचणीच्या हंगामात मजूर प्रचाराच्या मैदानात उतरल्याने शेतात पांढरे सोने उघड्यावर पडून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर मजूर टंचाईचे संकट कोसळले आहे शहरात मजूर टंचाई जाणवत असताना काही उमेदवारांनी थेट ग्रामीण भागातून मजूर गाड्यांनी आणण्याचा सपाटा लावला आहे.