भंडारा तालुक्यातील मौजा दवडीपार (बेला) येथील पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली, तसेच गावाचे पुनर्वसन हे नैसर्गिक आपत्ती निवारण विभागामार्फत न करता 'गोसे' विभागामार्फतच करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी केली.