जिल्ह्यातील सहा नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिवस १७ नोव्हेंबर आहे. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी संगणक प्रणालीत अडचण येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये सुटीच्या दिवशी म्हणजे दि.१५ व १६ नोव्हेंबर या शनिवार व रविवारी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे.