राज्यातील कारखान्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आमदार नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरत सांगितले की प्रत्येक अधिवेशनात या दुर्घटनांची चर्चा होत असली तरी सुरक्षिततेसाठी नियुक्त अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे, तसेच कारखान्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट खाजगी संस्थांकडून केले जात असून त्यांच्या अहवालांवर महाराष्ट्रातील कारखाने सुरू आहेत; मात्र या सर्व प्रक्रियेनंतरही निरपराध नागरिक जीव गमावत आहेत.