सिकलसेल आजाराचे अधिक प्रमाण असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल तपासणी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाने काटेकोरपणे नियोजन करुन जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवा, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.