तेल्हारा तालुक्यासह घोडेगाव, वाडी, आदमपूर, वडगाव रोटे, वांगरगाव, बाभुळगाव, तळेगाव पा., तळेगाव डौ., वरूड वडनेर, ऊकळी, निंभोरा आदी परिसरात आज एकतासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांची मोठी धांदल उडाली. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पिके झाकून ठेवावी.