नागझिरा अभयारण्यात कोणतीही हरकत न मागता थेट १७३ गावांचा समावेश करण्याचे 'नोटीफिकेशन' काढल्याच्या मुद्द्यावर आ. नाना पटोले यांनी ९ डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास हिवाळी अधिवेशनादरम्यान चिंता व्यक्त केली. त्यांनी निदर्शनास आणले की, वन्यजीव संरक्षणासाठी व्यवस्था होत असताना, अभयारण्यात रानडुक्करे, हरणे आणि सांबर यांसारख्या गवतावर जगणाऱ्या प्राण्यांसाठी पोषक वनस्पती टिकलेल्या नाहीत.