जालना: विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेचा जालना जिल्ह्यात थाटात शुभारंभ; उटवद येथे जिल्हास्तरीय उद्घाटन
Jalna, Jalna | Jul 3, 2026 जालना तालुक्यातील मौजे उटवद येथे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात ’विकसित भारत जी-रामजी’ कायदा, 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारीया यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गुरुवार दि. 3 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, आशा वर्कर्स उपस्थित होते.