काटोल बसस्थानकासारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली बाजार समितीची मौल्यवान जागा विक्रीला काढण्याचा डाव विद्यमान संचालक मंडळाने रचला असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मालमत्तेवर संचालकांचा डोळा असल्याचा आरोप करत, 'बाजार समिती बचाव कृती समिती'ने या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला आहे.