इंटरनेट सुविधा, संगणक अथवा स्मार्टफोनचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा यांच्या वतीने आज दि 17 डिसेंबर ला 12 वाजता तहसीलदारांना निवेदन सादर करून शेतमाल पेरेपत्रकाची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने - घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.