भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवार ५ जानेवारी रोजी ५:३० ते ७ वाजता दरम्यान पतंजली योग परिवार तर्फे 'भारत स्वाभिमान स्थापना समारोह दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिगंबर कापसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पतंजली जिल्हा प्रभारी सुनील भाग्यवानी, भारत स्वाभिमान प्रभारी सुधीर बावनकुळे, किसान सेवा प्रभारी गोविंद पडोळे व महिला प्रभारी रीता निर्वाण प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक मांडताना सुधी