देवळाली प्रवरा शहरातून जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या प्रवरा उजवा तट कालव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे व झुडुपांची वाढ झाल्याने परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बंगला ३२ चारीपासून मुळा ३ चारीपर्यंत कालव्यात घनदाट झुडुपे वाढली आहेत.,“सदर झुडुपे त्वरित हटवण्यात आली नाहीत, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काळे झेंडे दाखवू तसेच कार्यालयात विषारी सर्प सोडण्याचा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी दिला आहे.