मोमीनपुरा भागातील 'तकिया साधी हॉल' या इमारतीच्या दुरवस्थेमुळे आगामी निवडणुकीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही इमारत गेल्या १५ वर्षांपासून बंद असून ती अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. इमारतीचे छत आणि भिंती कमकुवत असल्याने, जीव मुठीत धरून काम करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.शेकडो मतदार आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही जागा अयोग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.