रिधूर गावात रस्त्याच्या वादातून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाले आहे. गुरांच्या शेडसाठी वापरच्या रस्त्यात खड्डे खोदण्यास विरोध केला असता, पाच जणांच्या टोळीने दोन भावांवर लोखंडी पहार आणि दांडक्यांनी हल्ला करून त्यांची डोकी फोडल्याची घटना रविवारी १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याबाबत रात्री ११ वाजता पाच जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.