राज्यात तब्बल १५ हजार १५८ शिक्षक पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती मंत्रीमहोदयांनी सभागृहात दिल्यानंतर शिक्षण विभागाची दयनीय स्थिती पुन्हा एकदा उघड झाली असून, अनेक जिल्हा परिषद शाळांना कुलूप लागले आहे. फक्त १० ते २० टक्के शिक्षक कार्यरत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले असताना प्रचंड नुकसान होत असून, शिक्षकांअभावी ग्रामीण भागातील शिक्षण पूर्णपणे ढासळल्याची परिस्थिती आहे.