पालघर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था कोणतीही नोंदणी न करता कार्यरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा संस्थांनी कायदेशीर नोंदणी करणे बंधनकारक असून अंतिम नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर ही मुदत आहे. त्यानंतर विना नोंदणी कार्य करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर यांनी दिली आहे.