मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या एकत्रित लोकवर्गणीतून पुलाच्या दोन्ही बाजूंना रेलिंग बसविण्याचे समाजोपयोगी कार्य आज दि 25 नोव्हेंबर ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. अपघातांच्या धोक्यामुळे वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या या कामासाठी सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.