वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत राहाटी गेटचे उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी देताना प्राधान्य द्यावे, अशी ठाम भूमिका मांडली. कौंडण्यपूर व सेवाग्रामसारख्या ऐतिहासिक स्थळांना अपेक्षित प्रसिद्धी मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वाघ व अस्वलांच्या दहशतीमुळे शेतकरी संकटात सापडले असून प्रशासनाने स्थानिकांच्या रोजगार व सुरक्षेबाबत गंभीर विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. कार्यक्रमाला प