जिल्ह्यातील भिसी-शंकरपूर-आंबोली-आसोला शेतशिवारात दहशत माजवणारा नरभक्षक ‘कालू’ वाघ आज दि 10 नोव्हेंबर ला 5 वाजता अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. शंकरपूर येथील ईश्वर भरडे यांचा बळी घेतल्यापासून या वाघाने परिसरात भीतीचं साम्राज्य निर्माण केलं होतं. नागरिकांचा चक्काजाम आंदोलनानंतर वनविभागाने तातडीने मोहीम राबवत आज सोमवारी सायंकाळी या वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.