हिंगणघाट आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तरुण तरुणीचे लक्ष फक्त मोबाईलमध्ये असुन धार्मिक कार्यक्रमात फक्त ७० पार केलेले लोकच मोठ्या संख्येने दिसतात हि सर्वांसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. माणसाने संसारा सोबतच परमार्थ केला तर आपले जीवन सार्थक होते. याकडे सुध्दा लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असुन समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. असे मत आ.कुणावार यांनी पिंपळगाव येथे त्यांनी दिलेल्या ३० लक्ष रुपये निधीतून उभारलेल्या सुसज्ज समाज भवन लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केले