गडचिरोली जिल्ह्यातील येरकड गावात पती-पत्नीच्या वादात पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीने राहत्या घरात तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गडचिरोली तालुक्यातील येरकड या गावातील ही घटना उघडकीस आली असून सुधाकर नाजुकराव मडावी वय 36 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनीषा केशव उसेंडी या महिलेशी सुधाकर नाजुकराव मडावी यांचा प्रेम विवाह तेरा वर्षांपूर्वी झाला होता. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होतो या वादातून मनीषा उसेंडी या माहेरी निघून गेल्या होत्या