शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा कोलमडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिग्नलवरील सर्व टायमर बंद ठेवले आहेत, तसेच महानगरपालिकेने सिग्नलमधील बिघाड दूर करण्यासाठी तात्काळ कोणताही पुढाकार न घेतल्यामुळे शहरात अनागोंदी माजली आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाला आज दि 13 डिसेंम्बर ला 12 वाजता जाब विचारत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, आता संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने होत असलेल्या अपघातांची आणि सामान्य नागरिकांच्या गैरसोयीची गंभीर दखल घेतली आहे.