शासन जर संवेदनशील असेल तर ते जनतेपर्यंत पोहचू शकते आणि जनतेची सेवा करू शकते. प्राण्यांच्या बाबतीतही संवेदनशील असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे झिरो रेबीज निर्मुलन अभियान कौतुकास्पद आहे. पनवेल महापालिकेने या शिबिराच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.तसेच महापालिकेने पाळीव श्वानांसाठी फिरते रूग्णालयही सुरू केले आहे.अशा विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्यावत शहर होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.