महाड: रायगड जिल्ह्यातील भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केली पाहणी
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आज गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी नुकसानग्रस्त शेतीची थेट शेतशिवारात जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना भातशेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.