वर्धा जिल्ह्यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे आयोजन सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी एकूण ८,०९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,७४४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ३५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. यंदा परीक्षेची एकूण उपस्थिती ९५.६२ टक्के इतकी नोंदवण्यात आली असून प्रशासनाकडून परीक्षेच्या व्यवस्थेचे यशस्वी नियोजन करण्यात आल्याची माहिती दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास देण्यात आली आहे.