पट्टेदार वाघाने पांजरा गोंडी बोथली परिसरात धुमाकूळ घातल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली. पांजरा गोंडी गावालगत असलेले शेतातील गोठ्यात बकऱ्या बांधून असताना 21 चे मध्यरात्री वाघाने बकऱ्यावर हल्ला केला सहा बकऱ्या ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाली .आज सकाळी शेतात शेतकरी गेला असताना त्याला हे चित्र दिसून आले दोन लाख रुपयाचे नुकसान झाले ,तर बोथली येथे वाघाच्या हल्ल्यात गीर जातीच्या गायीच्या वासरा चा फडशा पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि गोपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..