अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळोखी करणारी घटना समोर आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पॅकेज दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र वास्तवात प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त तीन, पाच आणि एकवीस रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. या अल्प रकमेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.