राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र वे राज्य शासनातर्फेडीबीटी तत्वावर कृषी समृद्ध योजना राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, कृषी औजारे,शेततलाव, सूक्ष्म सिंचन आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा सर्वात जास्त शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली