खामगाव: खामगांव तालुक्यात तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार सुनील पाटील यांना निवेदन देऊन केली
खामगांव तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतमालाचे झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावे व दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान तहसीलदार सुनील पाटील यांना भारतीय जनता पार्टी खामगाव ग्रामीण मंडळ २ चे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर पाटेखेडे यांनी निवेदन देऊन केली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस व चक्रीवादळामुळे कपाशी, सोयाबीन, तुर, ज्वारी, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.