घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३, रा. नवनाथ नगर, हरिविठ्ठल नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास हरीविठ्ठल नगरात उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.