पातुर सर्व्हिस एन्ट्री रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे सामाजिक कार्यकर्ते अल्हाज मसूद अहमद खान यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. चेतावणी फलक नसल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कारवाईची मागणी करत मसूद खान यांनी नितीन गडकरींना “अकोल्यातील रस्त्यावर सामान्य नागरिक म्हणून चालून पाहा” असे थेट आव्हान दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रतिक्रिया देत केले.