अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष आता चिंतेचा विषय झाला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वनविभागाला या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश नागरिकांच्या संतापाला कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे. अश्यातच २ डिसेंबर रोजी पारनेर तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध भागुबाई खोदडे यांचा मृत्यू झाला. या घटनेला आठ दिवस उलटले तरी देखील कारवाई झाली नाही त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं