डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना मंजुरी मिळाली होती. या मंजुरीच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी बँक कर्ज काढून विहिरींचे बांधकाम पूर्ण केले. मात्र आता योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत संबंधित निधी इतरत्र वळवण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने तात्काळ मंजूर निधी वितरित करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे..