बोरगाव मंजू परिसरात घडली. काल रात्री राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात पती धीरज सिरसाठ, पत्नी अश्विनी सिरसाठ आणि आरिफ खान या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कंडक्टर अन्वर खान गंभीर जखमी झाला आहे. खेर्डा येथील आपला नाश्ता व चायनीज व्यवसाय आटोपून परतताना त्यांची गाडी अचानक बंद पडली. टोचन करून आणत असताना त्यांनी महामार्गावर टायर तपासण्यासाठी गाडी थांबवली. त्याचवेळी भरधाव अज्ञात वाहनाने चारही जणांना जोरदार धडक दिली आणि क्षणात सणाचा आनंद शोकांतिका बनला.