पातूर पोलिस स्टेशनच्या समोरच्या भरचौकात गेल्या चार-पाच वर्षांपासून बाहेरील कुटुंबांनी रस्त्यावरच तंबू ठोकत वास्तव्यास सुरुवात केली असून रहदारीवर मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दिवसभर त्यांची लहान मुले रस्त्यावर भिक मागत फिरतात, तर काही जण वाहतूक मार्गावरच भांडण, ओरडाट करीत असल्याची तक्रार व्यापारी आणि नागरिकांकडून केली जात आहे. जुन्या बसस्थानक व पोलिस स्टेशनसमोरच हा गोंधळ चालू असल्याने "नेमकी कायदा-सुव्यवस्था कुठे आहे?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा