पिंप्री माळी येथील गोठ्यातील पाच म्हशी चोरीला गेल्या. रोज परिसर बदलून शेती अवजारे, शेतीपूरक साहित्य आणि आता पशुधन अशा प्रकारच्या चोर्या ह्या सर्रास घडत आहेत.चोरट्यांवर पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा धाक उरला नाही अशा प्रकारची परिस्थिती मेहकर तालुक्यात निर्माण झाली आहे... यावर पोलीस यंत्रणेने त्वरित कठोर पावले उचलून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या. अशा प्रकारची मागणी पांडुरंग पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी केली आहे.या प्रकारांमुळे शेतकरी अत्यंत हवालदील होत आहे. ह्या प्रकारांवर लवकरच प्रतिबंध न बसल्यास आम्हाला पोलीस यंत्रने विषयीच आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा पाटील यांनी दिला आहे.