नांदेड जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पावसाने चांगलाच थैमान घातला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन हाती आलेली पिके ही पाण्याखाली होती, उरली सुरली कसर देखिल आता परतीचा पाऊस पूर्ण करत असून आज रोजी दुपारी 3 ते 6 च्या दरम्यान कुठे कुठे पावसाने हजेरी लावली असल्याने आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे यावेळी पाहायला मिळाले तर शेतकरी हे आपले उत्पादन वाचवण्यासाठी धावपळ करतांना पाहायला मिळाले आहेत.