नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून, जिल्हा पोलीस दलाने अवैध व्यवहारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात रोकड, पिस्तूल, गांजा, मद्य आणि इतर वस्तू मिळून १ कोटी १२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेतली.